1972 मधल्या USA Apollo Mission नंतर ५० वर्षात चंद्रावर एकही Human Landing झालं नाही, कारणं काय ?
#BolBhidu #Chandrayaan3 #moonlanding
भारताचं चंद्रयान-३ चंद्रावर लँड होण्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलंय. विक्रम लँडर शेवटच्या १५ मिनिटात कसं लँडिंग करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. हे मिशन यशस्वी झालं, तर भारत चंद्रावर पोहोचणारा चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरेल. पण मागच्या ५० वर्षात चंद्रावर जाण्याचं प्रत्येक मिशन हे मानवरहित मिशन आहे. मागच्या ५० वर्षात एकही माणूस चंद्रावर पोहोचलेला नाही.
साहजिकच याचं कारण काय असा प्रश्न चर्चेत येतो. १९६९ मध्ये नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पोहोचल्यानंतर पुढच्या ३ वर्षात अमेरिकेनं १२ माणसांना चंद्रावर पाठवलं. पण १९७२ नंतर एकही माणूस चंद्रावर का गेला नाही ? असा प्रश्न पडतो. जेवढा जोर पहिल्या मिशनला लावला होता, तसा जोर अमेरिकेनं पुन्हा लावला नाही. अमेरिकेसोबतच बाकीचे देशही या स्पर्धेत उतरले नाही. आणि १९७२ नंतर चंद्रावर मानवरहित मिशनच पार पडत राहिली. यामागची नेमकी कारणं जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/